महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि .४ मे । महाराष्ट्रातील हवामानात होणाऱ्या बदलांची साखळी पुढील काही दिवस अशीच सुरु राहणार असून, राज्यात पुढील 4 ते 5 दिवसांसाठी यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. हवामान विभागानं दिलेल्या या इशाऱ्याच्या पार्श्वभूमीवर राज्यातील बहुतांश भागांमध्ये हलक्या ते मध्यम स्वरुपातील पावसाच्या सरी बरसतील असा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
ढगांच्या गडगडाटासह राज्यातील विदर्भ आणि कोकणातील काही भागात पावसाची हजेरी जास्त असेल. विदर्भाला पावसाचा तडाखआ तुलनेनं जास्त बसेल असा अंदाज वर्तवण्यात आला आहे.