अजित पवारांकडे अर्थखाते नकोच ; आमदार बच्चू कडू

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. १२ जुलै । काल आमची मुंबईत बैठक झाली, पण मुंबईत राहून मंत्रीपद भेटतंच असं नाही. हा बाजारातून भाजी आणण्याचा किंवा पूजा पाठचा थोडीच विषय आहे, असे म्‍हणत आमदार बच्चू कडू यांनी सध्याच मंत्री मंडळ विस्तार होणार नाही असा अंदाज वर्तविला. आमदार बच्चू कडू यांनी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्याकडे अर्थमंत्रीपद देण्यास पुन्हा एकदा विरोध केला आहे. शिंदे गटाचे बंड यावरून झाले, आता पुन्हा ते विरोध करीत असताना अपक्ष बच्चू कडूंनीही नाराजी व्यक्त केली आहे.

विमानतळावर माध्यमांशी बोलताना आमदार बच्चू कडू म्हणाले, सध्या राज्यात तीन इंजनचे सरकार आहे. ते मजबूत पण होवू शकते आणि ते पुन्हा कोसळूही शकते. म्हणूनच जेवढं मजबूत होईल तेवढे मजबूत करण्याचा प्रयत्न मुख्यमंत्री करतील. खाते वाटपात काही गोष्टी किंतू-परंतू होऊ शकतात, अशी भीती वर्तवितानाच आज प्रत्येकाला असं वाटतं की, अजित पवारांकडे अर्थखातं गेले नाही पाहिजे असे बच्चू कडू यांनी ठासून म्हणाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *