महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. २५ जुलै । राज्यात सर्वदूर होत असलेल्या पावसामुळे अनेक नद्यांना पूर आला आहे. यामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले असून राज्य सरकारच्या वतीने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी मदतीची घोषणा करण्यात आली आहे. या परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांनी बैठक बोलावली असून राज्यातील सर्वच जिल्ह्यांच्या जिल्हाधिकाऱ्यांना व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे बैठकीला हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
राज्यातील काही जिल्ह्यात मुसळधार पाऊस होत असल्याने तर दुसरीकडे काही जिल्ह्यामध्ये शेतकरी पावसाआभावी संकटात सापडला आहे. त्यात विदर्भातील अकोला, बुलडाणा, वाशिम आणि यवतमाळ जिल्ह्यात पूरस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे शेतीचे प्रचंड नुकसान झाले आहे. या जिल्ह्यांतील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी राज्य सरकारच्या वतीने मदत देखील जाहीर करण्यात आली आहे.
या सर्व पार्श्वभूमीवर राज्याचे अर्थमंत्री अजित पवार अॅक्शन मोडमध्ये आले आहेत. अजित पवार यांनी राज्यातील सर्व जिल्ह्याच्या जिल्हाधिकाऱ्यांची बैठक बोलवालली आहे. या बैठकीत अजित पवार विविध जिल्ह्यातील पावसाची आणि पूरस्थिती जाणून घेणार आहेत. ही बैठक व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे होणार आहे.