कोकणवासीयांसाठी मुख्यमंत्र्यांचं गिफ्ट, गणेशोत्सवात कोकणात जायला मोफत एसटी

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. २० ऑगस्ट । आगामी लोकसभा निवडणुकीसाठी मुंबईतील सहा लोकसभा मतदारसंघांत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेने तयारी सुरू केली आहे. मुख्यमंत्र्यांच्या वर्षा बंगल्यावर शिवसेनेच्या १८ विभागप्रमुखांची शनिवारी बैठक झाली. त्यात आगामी गणेशोत्सवासाठी मुंबई महापालिकेच्या प्रत्येक वॉर्डातून कोकणात जाणाऱ्या भाविकांसाठी एसटीच्या दोन बस मोफत उपलब्ध करून देण्याचा निर्णय झाल्याचे समजते.

बाळासाहेब ठाकरे यांना अभिप्रेत असलेल्या हिंदुत्वाचा मुद्दा प्रकर्षाने मांडण्याचे या बैठकीत ठरले. त्याचाच भाग म्हणून गणेशोत्सव, दहीहंडी उत्सव, मंगळागौर अशा सणांना अधिक प्रमाणात मदत करण्याचा निर्णय घेण्यात आला. मुंबईतील ३६ मतदारसंघांत मंगळगौर उत्सव मोठ्या प्रमाणात साजरा करण्यात येणार आहे. खा. श्रीकांत शिंदे यांनी मुंबई महापालिकेच्या प्रत्येक वॉर्डात जनजागृतीचा कार्यक्रम हाती घेतला आहे. ठाकरे गटाच्या तुलनेत शिवसेनेला उत्तम प्रतिसाद मिळत असल्याचे सांगण्यात येते. या बैठकीस मुख्यमंत्री शिंदे हे काही कामानिमित्त उपस्थित नसले, तरी त्यांचे चिरंजीव खा. श्रीकांत शिंदे, नरेश म्हस्के व अन्य पदाधिकारी उपस्थित होते. मुंबईत शिंदे यांच्या शिवसेनेने प्रभावी काम करण्याचे ठरविले आहे, असे त्या पक्षाच्या प्रवक्त्या आ. मनिषा कायंदे यांनी सांगितले.

‘राज्य सरकार अतिशय नियोजनबद्ध नामांकित संस्थांच्या माध्यमातून विविध पदभरतीच्या परीक्षा घेत आहे. कुठलाही गैरप्रकार करण्यास वाव नसून परीक्षा केंद्रांवरील कर्मचाऱ्यांनासुद्धा दक्ष राहण्याचे निर्देश आहेत. त्यामुळेच नाशिक येथे परीक्षा केंद्रावर तलाठी पदाच्या ऑनलाइन परीक्षेच्यावेळी तीन संशयितांना पकडण्यात यश आले. या परीक्षा व्यवस्थित पार पाडण्यासाठी राज्य सरकार कटिबद्ध आहे, याविषयी कुणीही संभ्रम निर्माण करू नये आणि अफवाही पसरवू नये,’ असे आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले.

‘नाशिक शहरातील म्हसरूळ पोलिस ठाण्याच्या हद्दीत परीक्षा केंद्रावरून पोलिसांनी तीन संशयितांना पकडले. त्यांच्याकडून टॅब, वॉकीटॉकी, मोबाइल फोन, हेडफोन असे साहित्य जप्त करण्यात आले आहे. त्यांना चार दिवसांची पोलिस कोठडी देण्यात आली असून कोणत्याही परिस्थितीत पारदर्शी आणि शिस्तबद्ध पदभरतीच्या परीक्षा घेण्यात येत आहेत,’ असेही मुख्यमंत्री म्हणाले. ‘पूर्वीच्या काळात अशा स्पर्धा परीक्षांत काही गैरप्रकार झाल्याचे उघडकीस आले होते. सदोष भरती प्रक्रियेमुळे विद्यार्थ्यांना नाहक मनस्ताप सहन करावा लागला होता. म्हणूनच राज्य सरकारने टीसीएस आणि आयबीपीएस या कंपन्यांकडून या परीक्षा घेण्याचा निर्णय घेतला. या संस्था काटेकोर या परीक्षा घेतील. राज्य सरकारचे सर्व प्रक्रियेकडे बारकाईने लक्ष आहे,’ असेही त्यांनी नमूद केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *