आजपासून देशात अनलॉक २.० सुरू;

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ – ऑनलाईन – विशेष प्रतिनिधी – मुंबई – देशभरात करोनाचा संसर्ग तीव्र गतीने वाढत असताना आजपासून देशात अनलॉक २.० ची सुरुवात होत आहे. यासाठी केंद्र सरकारने नवी नियमावली जारी केली आहे. हा टप्पा १ जुलै पासून ते ३१ जुलैपर्यंत सुरू राहणार आहे. देशात तब्बल ४ महिन्यांसाठी लॉकडाउन लागू करण्यात आला. त्यानंतर टप्प्याटप्प्याने अनलॉक लागू करण्यात येत आहे. अनलॉक १ च्या काळात नागरिकांना अनेक प्रकारच्या सूट देण्यात आली होती. त्यानंतर अनलॉक २.० वाढवण्यात आला आहे.

अनलॉक २.० मध्ये होणार हे मोठे बदल, पाहुयात…

> आजपासून विमान आणि ट्रेनची संख्या वाढवणार. आतापर्यंत मर्यादित संख्येत या सेवा सुरू राहणार. आता तीच संख्या दुप्पट होऊ शकते.

> आता रात्री १० वाजल्यापासून पहाटे ५ वाजेपर्यंत नाइट कर्फ्यू असणार. पूर्वी ही वेळ रात्री ९ ते पहाटे ५ वाजेपर्यंत होती.

> दुकानात एकाचवेळी ५ लोक जाऊ शकतात. मात्र यासाठी शारीरिक अंतराचा नियम पाळणे बंधनकारक.

> १५ जुलैपासून केंद्र आणि राज्य सरकारांच्या प्रशिक्षण संस्थांमध्ये कामकाज सुरू होऊ शकेल.

 

या’ गोष्टी राहणार आताही बंदच

> शाळा आणि महाविद्यालये ३१ जुलैपर्यंत राहणार बंद. याबाबतचा पुढील निर्णय राज्य सरकारांशी चर्चा करून घेतला जाईल.

> मेट्रो रेल्वे बंदच राहणार

> चित्रपटगृहे बंदच राहणार

> स्वीमिंग पूल बंद राहणार

>एंटरटेनमेंट पार्क

> बार

> ऑडिटोरियम

>असेम्बली हॉल

या व्यतिरिक्त सरकारने आताही प्रतिबंधित क्षेत्रात कडक नियम सुरूच ठेवले आहेत. या क्षेत्रात केवळ अत्यावश्यक व्यवहारासाठीच मंजुरी देण्यात आली आहे. या व्यतिरिक्त कमीतकमी लोकांना बाहेर जाण्याची परवानगी देण्यात आली आहे. या बरोबरच प्रतिबंधित क्षेत्रात करोनाच्या चाचण्याही वाढवल्या जाणार आहेत. दरम्यान, या पूर्वी अनलॉक-१ मध्ये धार्मिक स्थळे, मॉल सुरू करण्याची परवानगी देण्यात आली होती.

अनलॉक-१ मध्ये नागरिकांनी निष्काळजीपणा दाखवल्याचे सांगत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाला उद्देशून केलेल्या भाषणात चिंता व्यक्त केली आहे. आपण जराही निष्काळजी राहता कामा नये आणि करोनाचा पराभव करण्यासाठी नियमांचे पालन करणे अत्यंत आवश्यक असल्याचे मोदी यांनी सांगितले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *