विधान परिषदेसाठी निवडणूक अटळ? विधान परिषदेच्या ११ जागांसाठी १२ उमेदवार?

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. २ जुलै ।। भाजप नेत्या पंकजा मुंडे यांचा राजकीय वनवास संपलाय. लोकसभेतील पराभवानंतर त्यांचे पुनर्वसन करण्यात आलंय. विधान परिषदेसाठी भाजपने पाच जणांची नावं जाहीर केलीयत. पंकजा मुंडे, डॉ.परिणय फुके, सदाभाऊ खोत, योगेश टिळेकर आणि अमित गोरखे यांना विधान परिषदेवर संधी दिलीय. भाजपचे उमेदवार आज उमेदवारी अर्ज दाखल करतील.

विधानपरिषदेची निवडणूक आता अटळ मानली जातेय. परिषदेच्या 11 जागांसाठी 12 उमेदवार रिंगणात असण्याची शक्यताय. महायुती 9 उमेदवार देण्याची शक्यताय. त्यात भाजपनं 5, शिंदे गटानं 2 तर अजित पवारांच्या राष्ट्रवादीनं 2 जागांवर उमेदवार जाहीर केलेत. आता मविआही तिसरा उमेदवार देण्याची शक्यताय. काँग्रेसनं प्रज्ञा सातव आणि ठाकरे गटानं मिलिंद नार्वेकर असे दोन उमेदवार जाहीर केलेत. तर शेकापचे जयंत पाटील मविआचे तिसरे उमेदवार असण्याची शक्यताय. असं झाल्यास विधानपरिषदेची निवडणूक अटळ आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *