महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि.३ जुलै ।। Nawab Malik : अजित पवारांनी मंगळवारी रात्री देवगिरी बंगल्यावर नेत्यांची बैठक बोलावली होती. यावेळी नवाब मलिक उपस्थित राहिल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. नवाब मलिकांना सोबत घेण्याला भाजपने कडाडून विरोध केलेला असतानाही ते बैठकीला हजर राहिल्याने पुढे काय होणार असा प्रश्न उपस्थित होतोय.![](https://maharashtra24.com/wp-content/uploads/2024/07/Google-Banner_900X600pixel-11-1.jpg)
नवाब मलिकांच्या हजेरीवरुन राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना प्रश्न विचारला असता त्यांनी एका वाक्यात विषय संपवला. बुधवारी विधीमंडळात जात असताना अजित पवार यांना नवाब मलिकांच्या बैठकीला बैठकीला उपस्थित राहण्याबाबत प्रश्न विचारण्यात आला.
उत्तरात अजित पवार म्हणाले की, तुम्हाला काय त्रास होतो का? एवढ्या एका वाक्यात अजित पवारांनी विषय संपवला. त्यामुळे नवाब मलिकांना सोबत घेण्याबाबत अजित पवार ठाम आहेत का? असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होत आहे. भाजपने मात्र मागच्या वर्षीच्या हिवाळी अधिवेशनात मलिकांना सोबत नको, असा सूर आळवला होता. स्वतः फडणवीसांनी अजित पवारांना तसं पत्र लिहिलं होतं.