राज्यात स्वाइन फ्लू, मलेरियासह डेंग्यूचे थैमान ; रुग्णसंख्येत झपाट्याने वाढ

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. ९ ऑक्टोबर ।। ऑक्टोबर हिटचा तडाखा हळूहळू जाणवायला सुरुवात झाली असली तरीही साथीच्या आजारांचा ताप आतापर्यंत राज्याला जाणवत असल्याचे आरोग्यविभागाने दिलेल्या माहितीमधून दिसून येते. सात ऑक्टोबरपर्यंत राज्यात स्वाइन फ्लूमुळे ५३, तर मलेरियामुळे पंधरा, तर डेंग्युमुळे एकोणीस जणांना प्राण गमवावे लागले आहेत. चिकनगुनियामुळे राज्यात एकाही मृत्यूची नोंद झालेली नाही.

आजार-रुग्णसंख्या-मृत्यू
कॉलरा – ४३८ – ३
गॅस्ट्रो – ४२६ – ४
अतिसार – १७४३ – ६
कावीळ – ४६२ – १
एकूण – ३०६९ -१४

स्वाइन फ्लूमुळे सात ऑक्टोबरपर्यंत राज्यात २११३ रुग्णसंख्येची नोंद झाली असून, ५३ जणांचा जीव या आजारामुळे गेला आहे. २०२२ मध्ये मृत्यूची संख्या सर्वाधिक म्हणजे २१५ इतकी होती. त्यानंतर २०२३ मध्ये ही संख्या ३२ इतकी झाली. इन्फल्युएंझा ए, एच१एन१, एच३एन२ तापाची एकूण सातशे रुग्णसंख्या नोंदवण्यात आली. नाशिकमध्ये २६३, ठाणे येथे २५०, पुण्यामध्ये ३४५, कोल्हापूरमध्ये २२२, नागपुरमध्ये १०२ रुग्णांची नोंद झाली आहे. लेप्टोच्या ७८७, तर स्क्रबटायफसच्या १२ रुग्णांची नोंद करण्यात आली असून, या दोन्ही आजारांमुळे एकेका रुग्णाचा मृत्यू झाला आहे. डोक्सीसायक्लीन या औषधाची उपलब्धता करण्याचे निर्देश आरोग्य विभागाने दिले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *