महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. ६ जानेवारी ।। महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांचे निकाल जाहीर झाले आणि राज्यात पुन्हा एकदा महायुतीचं सरकार स्थापन होणार हे निश्चित झालं. अनेक नाट्यमय घडामोडी आणि उत्सुकता प्रचंड ताणली गेल्यानंतर अखेर देवेंद्र फडणवीसांनी मुख्यमंत्रीपदाची तर एकनाथ शिंदे व अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. त्यानंतर यथावकाश मंत्रीपदांचं वाटप, मंत्रीमंडळ विस्तार व खातेवाटपही पार पडलं. पण आता ज्या मतदारांना निवडणुकीच्या आधी हात जोडून मतांचा जोगवा मागितला, त्याच मतदारांसाठी शिवसेना (एकनाथ शिंदे) पक्षाच्या एका आमदारांनी शिवीगाळ केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. हा व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे.
शिवसेना (एकनाथ शिंदे) आमदार संजय गायकवाड यांनी रविवारी बुलढाण्यात एका जाहीर सभेत केलेलं विधान सध्या चर्चेचा विषय ठरलं आहे. सभेत बोलताना संजय गायकवाड यांची जीभ घसरली आणि त्यांनी थेट मतदानांचा पैशांसाठी विकले गेलेले म्हटलं. संजय गायकवाड एवढ्यावरच थांबले नाहीत, तर त्यांनी “तुमच्यापेक्षा तर रांxx बऱ्या” असं गंभीर विधान केल्यामुळे त्यावरून तीव्र संताप व्यक्त होऊ लागला आहे. एबीपी माझानं यासंदर्भातलं वृत्त दिलं आहे.
फक्त दारू मटण पैसे दोन दोन हजारात विकले गेले
ह्यांच्या पेक्षा रां***** बऱ्याशिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड ह्यांनी ही मुक्ताफळे उधळली आहेत.
— SΔT∇IҜ ∇ΣΣR SUΠDΣR βHΔU 🙏🏻 (@Sundarspeak57) January 5, 2025
काय म्हणाले संजय गायकवाड?
संजय गायकवाड यांनी बुलढाण्यात एका कार्यक्रमानिमित्त आयोजित सभेमध्ये मतदारांवरच टीका केली. “तुम्ही मला साधं एक मत देऊ शकत नाही? फक्त दारू, मटण, पैसे? अरे दोन दोन हजारांत विकले गेले साले. दोन हजारात? पाच हजारात? यांच्यापेक्षा तर रांXXX बऱ्या”, असं संजय गायकवाड यावेळी म्हणाले आहेत.
“अरे एकीकडे हा आमदार आपल्या लेकीबाळींचं कल्याण करायला निघाला, या मतदारसंघाचं कल्याण करायला निघाला आहे. माझा त्यात कोणताही वैयक्तिक स्वार्थ नाही. पण हे लोक संजय गायकवाडला पाडा वगैरे म्हणत होते. समजा मी पडलो असतो तर सगळे प्रकल्प होऊ शकले असते का? माझं आव्हान आहे, एक खडाही पडला नसता”, असा दावाही त्यांनी केला. यावेळी आसपासच्या भागातल्या कामांची यादी आणि त्यासाठीचा निधी याची यादी संजय गायकवाड यांनी वाचून दाखवली. शिवाय, समोर बसलेल्या लोकांना उद्देशून “तुम्ही तर परतफेड केलीत. तुमच्याबद्दल हा विषयच नाहीये”, असं म्हणायलाही ते विसरले नाहीत.
