आजपासून खरंच एसटीचे तिकीट महागले? अजित पवारांनी स्पष्टचं सांगितलं…

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि.२५ जानेवारी ।। एसटी महामंडळाने आजपासून प्रवासी भाडेवाढ होण्याची घोषणा केली आहे. आजपासून एसटीने 15 टक्क्यांची भाडेवाढ लागू केली आहे. मात्र या एसटी भाडेवाढबाबत संभ्रम असल्याचे पाहायला मिळतेय. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मात्र अद्याप भाडेवाढ करण्यात आली नाही, असं म्हटलं आहे. त्यामुळं एसटीची भाडेवाढीबाबत संभ्रम पाहायला मिळत आहे.

अजित पवार आज पुणे दौऱ्यावर आहेत. पुण्यात पत्रकारांशी बोलताना त्यांना एसटीच्या भाडेवाढीबाबत प्रश्न विचारला असता त्यांनी भाडेवाढीबाबत अद्याप कोणताही निर्णय झाला नाही, असं म्हटलं आहे.

‘एसटी भाडेवाढीच्या बाबत जास्तीत जास्त बसेसे घेऊन ग्रामीण भागातील आणि शहरी भागातील लोकांना उत्तम सेवा द्यायची आहे. मात्र तशा पद्धतीने चर्चा अजून चालली आहे. अंतिम निर्णय झालेला नाही. मुख्यमंत्री दावोसवरुन आत्ताच आले आहेत. अंतिम निर्णय मुख्यमंत्र्यांच्या कानावर घालूनच घेतला जाईल,’ असं अजित पवार यांनी म्हटलं आहे.

‘एसटी भाडेवाडी बाबत अंतिम निर्णय झालेला नाही. मुख्यमंत्र्यांशी बोलून निर्णय होईल. जनता आणि महामंडळ दोघांच्या हिताचा विचार करून मध्यम मार्ग काढला जाईल. शहरी तसेच ग्रामीण भागामध्ये एसटीची सेवा अधिकाअधिक प्रमाणात उपलब्ध करून देणे तसेच नवीन बसेस खरेदी करणे यासाठी भाडेवाडीचा प्रस्ताव आहे. मात्र अंतिम निर्णय हा मुख्यमंत्र्याचा असतो,’ असं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी म्हटलं आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *