Pahalgam Attack: युद्धासाठी सज्ज व्हा : पहलगाम हल्ल्यानंतर केंद्र सरकारकडून हवाई दलाला आदेश

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. २९ एप्रिल ।। भारताचे नंदनवन असलेले जम्मू काश्मीरमध्ये पाकिस्तानच्या दहशतवाद्यांनी पोलीस वेशात येऊन 28 निर्दोष लोकांवर गोळ्या झाडून त्यांची हत्या केली. यानंतर सर्वत्र संतापाची लाट उफाळली असून भारतीय लष्कर हे सज्ज झाले आहे. पाकिस्तानला जशास तसे उत्तर देण्यासाठी राजधानी दिल्लीमध्ये देखील पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांच्यात बैठकींचे सत्र सुरू आहे.

काल फ्रांस आणि भारतामध्ये राफेल खरेदीसाठी 63000 हजार कोटींचा करार झाला. यामुळे पाकिस्तानचे धाबे दणाणले आहे. पाकिस्तानी लष्कराच्या सीमेवर हालचाली वाढल्याने भारतीय हवाई दलाला दोन मिनिटांच्या आत कारवाईसाठी सज्ज होण्याचे आदेश देण्यात आले आहे. भारत आणि पाकिस्तानमध्ये सध्या तणावाची परिस्थिति निर्माण झाल्यामुळे पाकिस्तानकडून नियंत्रन रेषा आणि आंतरराष्ट्रीय सीमेवर अधिक संख्येने तोफा आणण्यात आल्या आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *