महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. १२ मे ।। भारतीय कसोटी संघ एका मोठ्या बदलातून जात आहे. रोहित शर्माने कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली आहे. विराट कोहलीने निवृत्तीबाबत बीसीसीआयला कळवले असल्याचे वृत्त समोर आले होते. बीसीसीआय संघासाठी नवीन कर्णधारासाठी पर्याय शोधत आहे. इंग्लंडविरुद्धची मालिका सुरू होण्यासाठी फक्त काही आठवडे शिल्लक आहेत आणि निवडकर्त्यांसमोर एक मोठे आव्हान उभे राहिले आहे. रोहितच्या कर्णधारपदाच्या काळात जसप्रीत बुमराह उपकर्णधारपदी होता. बुमराह कर्णधार बनणार असं वातट असताना आता त्याने स्वत: याबाबत काय खुलासा केला आहे जाणून घ्या.
बुमराहला कर्णधार व्हायचे नाही…
जसप्रीत बुमराह स्वतः भारतीय कसोटी संघाचा कर्णधार होऊ इच्छित नाही. स्काय स्पोर्ट्सच्या अहवालात हा दावा करण्यात आला आहे. वर्कलोड मॅनेजमेंटमुळे जसप्रीत बुमराहनेही संघाचे नेतृत्व करण्यास नकार दिल्याचे वृत्त आहे. दुखापतींमुळे बुमराहच्या कारकिर्दीवर परिणाम झाला आहे. 2022-23 मध्ये, तो दुखापतीमुळे जवळजवळ एक वर्ष मैदानापासून दूर होता. जानेवारीमध्ये ऑस्ट्रेलिया दौऱ्यादरम्यान दुखापत झाल्यानंतर त्याला पुन्हा फिटनेस मिळवण्यासाठी चार महिने लागले.
Jasprit Bumrah has opted out of being India's next Test captain, with Shubman Gill and Rishabh Pant now the front runners, Sky Sports News understands 🚨 pic.twitter.com/R4xG7FIigT
— Sky Sports Cricket (@SkyCricket) May 11, 2025
पंत आणि गिल शर्यतीत
जसप्रीत बुमराहच्या नकारानंतर आता शुभमन गिल आणि ऋषभ पंतच्या नावांचा विचार केला जात आहे. गिल हा संघाचा आघाडीचा फलंदाज आहे आणि तो तिसऱ्या क्रमांकावर खेळतो. यष्टीरक्षक ऋषभ पंतचाही कसोटीत भारतासाठी चांगला विक्रम आहे. अहवालानुसार, ‘भारत आता गिल किंवा पंत यापैकी एका व्यक्तीला आपला पुढचा कसोटी कर्णधार म्हणून निवडू शकतो. निवड समिती पुढील आठवड्यात याबद्दल बोलतील.
शुभमनचे नाव आधीच चर्चेत होते, पण पंतचे नाव ऐकून अनेकांना आश्चर्य वाटते. पंतची कसोटी क्रिकेटमधील कामगिरी उत्कृष्ट राहिली आहे. त्याने अनेक कठीण सामन्यांमध्ये संघाला विजय मिळवून दिला आहे. पंतला गेल्या काही दिवसांपासून फॉर्ममध्ये अडचण येत आहे. तो आयपीएल 2025 मध्ये पूर्णपणे अपयशी ठरला आहे. यासोबतच, या काळात ऑस्ट्रेलियाला कोणताही मोठा पराक्रम करता आला नाही. ऑस्ट्रेलिया मालिकेत त्याने अनेक वाईट फटके खेळले, ज्यासाठी त्याच्यावर प्रचंड टीका झाली.