राज्य सरकारने शालेय बस वाहतुकीसंदर्भात लागू केले नवीन नियम

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. १३ जून ।। विद्यार्थ्यांच्या सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य देत राज्य सरकारने शालेय बस वाहतुकीसंदर्भात नवीन कडक नियम लागू केले आहेत. मागील शैक्षणिक वर्षात घडलेल्या काही दुर्दैवी घटनांच्या पार्श्वभूमीवर यंदा शाळा सुरू होण्यापूर्वीच हे खबरदारीचे उपाय योजण्यात आले आहेत. याअंतर्गत शालेय बसचालकांची पार्श्वभूमी कसून तपासली जाणार असून त्यांची नियमित मद्यपान आणि औषध चाचणी बंधनकारक करण्यात आली आहे.

शालेय शिक्षण विभागाने विद्यार्थ्यांच्या सुरक्षित प्रवासासाठी कडक पावले उचलली आहेत. यानुसार बसचालक, सफाई कामगार आणि महिला सेविकांची सकाळी व सायंकाळी अशा दोनवेळा मद्यपान व औषध चाचणी करणे अनिवार्य असणार आहे.

या नियमांचे काटेकोर पालन करण्याच्या सूचना राज्यातील सर्व शाळांना देण्यात आल्या आहेत. या नवीन नियमांमुळे शालेय विद्यार्थ्यांचा प्रवास अधिक सुरक्षित होईल आणि अनुचित प्रकारांना आळा बसेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *