असे धाडस आपल्या महाराष्ट्रात होतं कस ? एकदाच धूर निघाला पाहिजे, हर हर महादेव; नीतेश राणे कडाडले

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ – ऑनलाईन वृत्तसेवा – विशेष प्रतिनिधी – मुंबई – दि. ८ सप्टेंबर – छत्रपती संभाजी राजे यांच्या नावानं असलेल्या बिडीला भाजपचे आमदार नीतेश राणे यांनी तीव्र आक्षेप घेतला आहे. ‘बिडीला संभाजी राजेंचं नाव देण्याचं धाडस महाराष्ट्रात होतं, इथेच आपण कमी पडलो,’ अशी खंत नीतेश यांनी व्यक्त केली आहे.


पुण्यातील एक कंपनी छत्रपती संभाजी महाराजांच्या नावाने बिडीचं उत्पादन करते. याबाबत अनेकदा आक्षेप नोंदवले गेले आहेत. मात्र, अद्याप त्यावर कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही. आता पुन्हा एकदा हा मुद्दा समोर आला आहे.

‘संभाजी राजेंचं नाव बिडीला देण्याचं धाडस आपल्या महाराष्ट्रात होतं, इथेच आपण कमी पडलो! आत्ताच यांची हिंमत मोडली नाही तर उद्या अजून वाढेल. एकदाच धूर निघाला पाहिजे. हर हर महादेव,’ अशा तीव्र भावना त्यांनी व्यक्त केल्या आहेत.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *