महाराष्ट्र २४ – ऑनलाईन वृत्तसेवा – विशेष प्रतिनिधी – दि. १५ सप्टेंबर – बुलढाणा – तुम्ही मोटारीतून प्रवास करत असल्यास मास्क परिधान करणे बंधनकारक आहे. अन्यथा तुमच्यावरवर दंडात्मक कारवाईचा बडगा उगारण्यात येणार आहे. मोटारीतून दोन किंवा अधिक जण प्रवास करत असल्यास मास्क वापरणे गरजेचे आहे. एकटा चालक मोटारीत असल्यास मास्कची आवश्यकता नाही अशी माहिती सहपोलीस आयुक्त डॉक्टर रवींद्र शिसवे यांनी दिली.
मोटारीतून एकापेक्षा जास्त प्रवास करणाऱ्यांना मास्क वापरणे आवश्यक आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी २ सप्टेंबरपासून विनामास्क नागरिकांविरोधात कारवाईची मोहीम हाती घेतली आहे. प्रत्येक चौकात विना मास्क चालकांसह नागरिकांवर कारवाई करण्यात येत आहे. मात्र, मोटारीत मास्कची आवश्यकता आहे का अशी विचारणा सातत्याने करण्यात येत होती. त्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी मोटारीतून एकट्या चालकाला विमानास्कचा ग्रीन सिग्नल दिला आहे. दोन पेक्षा अधिक जणांनी प्रवास केल्यास डिस्टन्ससह मास्क लावून नियमांचे पालन करावे लागणार आहे.
नागरिक विनामास्क फिरल्याने कोरोनाचा प्रसार वेगाने होण्याची शक्यता जास्त आहे. त्यामुळे प्रवासादरम्यान मास्कचा वापर करणे गरजेचे आहे. मोटारीत एकटा चालक असल्यास त्याला मास्क आवश्यक नाही. मात्र दोन किंवा दोनपेक्षा जास्त नागरिक मोटारीतून प्रवास करत असल्यास मास्क परिधान करणे बंधनकारक आहे. त्यामुळे नागरिकांनी सोशल डिस्टन्सिंग पाळून पोलिसांना सहकार्य करावे- रवींद्र शिसवे सहपोलीस आयुक्त पुणे
3 सप्टेंबर रोजी भूषण यांनी एक पत्रकार परिषद घेतली होती. या पत्रकार परिषदेमध्ये त्यांना विविध प्रश्न विचारण्यात आले होते. यामध्ये काही पत्रकारांनी त्यांना विचारले की गाडीतून एकच माणूस म्हणजे स्वत: गाडी चालवणारा जात असेल आणि त्याने मास्क घातला नसेल तर त्याला पोलीस अडवतातत आणि त्याच्याकडून दंड वसूल करतात. एकट्याने प्रवास करणाऱ्या व्यक्तीला मास्क गरजेचा आहे का ? यावर बोलताना भूषण यांनी सांगितले की गाडीतून एकट्यानेच प्रवास करणाऱ्या व्यक्तीला गाडीत असताना मास्क लावण्याची गरज नाहीये. गाडीत असताना मास्क लावावा अथवा नाही याबाबत कोणतेही नियम कोरोनासंदर्भातील सूचनावलीमध्ये दिलेले नसल्याचं भूषण यांनी सांगितले.