Maharashtra Weather News : महाराष्ट्रात ‘उन्हाळी पावसाळा’; उकाडा आणि अवकाळी सरींचा दुहेरी फटका

Spread the love

Loading

✍️ महाराष्ट्र २४ | विशेष प्रतिनिधी | दि. २३ फेब्रुवारी २०२६ |मुंबई : राज्यात सध्या हवामानाचा पूर्णतः गोंधळ उडाल्याचं चित्र आहे. बहुतांश भागांतून थंडीने काढता पाय घेतला असताना उन्हाचा तडाखा वाढू लागला आहे. त्यातच मागील 48 तासांपासून पावसासाठी पूरक वातावरण तयार झाल्याने मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात अवकाळी सरींचा इशारा देण्यात आला आहे. India Meteorological Department (IMD) ने पूर्व विदर्भात वादळी पावसाचा ‘यलो अलर्ट’ जारी केला असून विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता व्यक्त केली आहे.

रविवारी Dajipur Wildlife Sanctuary आणि Fonda Ghat परिसरात मुसळधार पावसाने हजेरी लावली. काही ठिकाणी जोरदार तर काही भागांत तुरळक सरी कोसळल्या. या अवकाळी पावसामुळे स्थानिक जनजीवन विस्कळीत झाले. एकीकडे प्रखर उकाडा आणि दुसरीकडे अचानक पावसाच्या सरी—नेमका कोणता ऋतू सुरू आहे, असा प्रश्न नागरिकांना पडू लागला आहे. चंद्रपूर, गडचिरोलीसह सोलापूर, धाराशिव, लातूर आणि नांदेडमध्येही विजांसह पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.

हवामानातील या अजब बदलामागे बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्याचा परिणाम असल्याचे तज्ज्ञ सांगतात. मुंबई, ठाणे, नवी मुंबई आणि कोकण किनारपट्टीवर पुढील 24 तास दमट हवामान राहणार असून कमाल तापमान 35 ते 37 अंश सेल्सिअसदरम्यान राहण्याची शक्यता आहे. किमान तापमान सुमारे 25 अंशांपर्यंत राहील. वाढलेली आर्द्रता आणि उष्णतेची तीव्रता यामुळे उष्माघात, सर्दी-खोकला, व्हायरल संसर्ग यांचा धोका वाढू शकतो. त्यामुळे पुरेसे पाणी पिणे, दुपारच्या उन्हात बाहेर जाणे टाळणे आणि आरोग्याची विशेष काळजी घेणे आवश्यक आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *