काँग्रेस सत्तेत आल्यास हे तीनही कायदे रद्द करुन त्यास केराची टोपली दाखवू

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ – ऑनलाईन वृत्तसेवा – विशेष प्रतिनिधी – दि. ५ ऑक्टोबर – नवीदिल्ली – केंद्र सरकारने लागू केलेल्या कृषी कायद्याच्या विरोधात प्रदर्शन करणाऱ्या शेतकऱ्यांच्या समर्थनाथ काँग्रेसचे नेते राहुल गांधी पुढे सरसाकले आहेत. ऐन कोरोना महामारीच्या काळात हा कायदा लागू करण्याची गरज होती का? असा सवाल उपस्थित करीत केंद्र सरकारवर पुन्हा एकदा निशाणा साधला. आपण सत्तेत आल्यास हे तीनही कायदे रद्द करुन त्यास केराची टोपली दाखवू , अशी घोषणा राहुल गांधी यांनी रविवारी पंजाबमध्ये केली.

कृषी कायद्याच्या विरोधात शेतकऱ्यांचे सुरू असलेल्या आंदोलनास समर्थन दर्शविण्यासाठी राहुल गांधी रविवारी पंजाब येथील मोगा येथे पोहचले. त्यावेळी त्यांनी करील घोषणा केली. यावेळी पंजाबचे मुख्यमंत्री अमरिंदर सिंह, काँग्रेसचे महासचिव केसी वेणुगोपाल आणि नवज्योतसिंह सिद्धूदेखील उपस्थित होते.


यावेळी केंद्र सरकारवर निशाणा साधताना राहुल गांधी म्हणाले की, ज्यावेळी तुम्हांला कोणता कायदा लागू करायचा असेल त्यावेळी त्यासंदर्भात राज्यात आणि लोकसभेत चर्चा करायला हवी. प्रधानमंत्री सांगतात हा कायदा शेतकऱ्यांसाठी तयार करण्यात आला आहे. मग असे असेल तर तुम्ही संसदेत यावर खुली चर्चा का ठेवत नाहीत? असा प्रश्न त्यांनी यावेळी उपस्थित केला. जर शेतकऱ्यांची या कायद्याला पसंती आहे. तर संपूर्ण देशात याविरोधात शेतकरी रस्त्यावर का उतरले आहेत, असा सवाल त्यांनी यावेळी उपस्थित केला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *