मुख्यमंत्र्यांचे राज्यपालांना पत्र खेदजनक : फडणवीस

Spread the love

महाराष्ट्र २४ – ऑनलाईन वृत्तसंस्था – दि. १४ ऑक्टो .- प्रतिनिधी – जळगाव – राज्यपालांना प्राप्त होणारी निवेदने राज्यपाल मुख्यमंत्र्यांकडे पाठवत असतात. त्याचप्रमाणे मंदिरे उघडण्यासाठीची निवेदन देखील राज्यपालांनी मुख्यमंत्र्यांकडे पाठवली होती. मात्र, त्यावर मुख्यमंत्र्यांनी राज्यपालांना दिलेले उत्तर दुर्दैवी असल्याची टीका विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली.

राज्य सरकारने मदिरालये आणि बार सुरु केलेत. इतकेच नव्हे तर पर्यटन विभागाच्या पत्राचा आधार घेत वेळ देखील वाढवून दिला. तर मग मंदिरांचे एवढे वावडे का?, असा सवाल करताना मंदिरामुळे कोरोना वाढला असे चित्र नाही, असे फडणवीस म्हणाले.

मंदिरांमुळे केवळ भाविकांचीच आबाळ होते असे नाही तर छोट्या व्यावसायिकांनाही फटका बसतो. त्यामुळे सरकारला सुबुद्धी मिळो आणि लवकरात लवकर मंदिरे उघडण्याचा निर्णय सरकारने घ्यावा, असे फडणवीस म्हणाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *