महाराष्ट्र २४ ऑनलाईन – वृत्तसेवा – प्रतिनिधी – तुळजापूर – दि. १९ ऑक्टो – : राज्यात मागील काही दिवसांमध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळं मराठवाडा भागात झालेल्या शेतपीकांच्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार मराठवाडा दौऱ्यावर गेले. रविवारी सुरु झालेल्या या दौऱ्यात त्यांनी विविध गावांना भेट देत, थेट शेताच्या बांधावर जात आणि वाहनांचा ताफा थांबवत बळाराजाशी संवाद साधला. त्यांचे प्रश्न जाणून घेतले.
सोमवारी या पाहणी दौऱ्यादरम्यानच पवारांनी तुळजापूर येथे घेतलेल्या एका पत्रकार परिषदेत काही महत्त्वाचे मुद्दे मांडच अतिवृष्टीमुळं शेतीला मोठा फटका बसल्याची बाब स्पष्ट केली. आपल्या वक्तव्यातून आणि परिस्थितीचं गांभीर्य पाहता त्यांनी केंद्र आणि राज्याच्या मुख्यमंत्र्यांचं लक्ष वेधलं.