पंतप्रधानांनी विमानतळे विकली, आता देश विकत आहेत – प्रकाश आंबेडकर

Spread the love

महाराष्ट्र २४ ऑनलाईन – वृत्तसेवा – प्रतिनिधी – वॉशिंग्टन – दि. २१ ऑक्टो – : कोरोनामुळे देश अडचणीत सापडल्याचे कारण देत पंतप्रधान मोदी यांनी विमानतळे विकली, आता ते देश विकायला निघाले आहेत, अशी टीका वंचित बहुजन आघाडीचे नेते अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी केली. अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी सोलापुरात दाखल झाल्यानंतर आंबेडकर बोलत होते.

यावेळी आंबेडकर यांनी मोदी यांच्यासह फडणवीस आणि ठाकरे यांच्यावरही टीका केली. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना सत्ता गेल्याचा विसर पडल्याचं ते म्हणाले. तसंच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ठराविक जिल्ह्यात पाहणी करण्यापेक्षा सर्व नुकसानग्रस्त भागाचा दौरा करावा, असं ही आंबेडकर म्हणाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *