महाराष्ट्र २४ – ऑनलाईन वृत्तसेवा – विशेष प्रतिनिधी – दि. १५ डिसेंबर – : येणाऱ्या काळात, इथेनॉलपासून बनविलेल्या इंधनावर विमाने उडतील आणि याचे पैसे शेतकऱ्यांना मिळतील, असे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी म्हटले आहे. ही आमची दूरदृष्टी आणि स्वप्न आहे, असे मतही त्यांनी व्यक्त केले.
आज देशामध्ये ८ लाख कोटी रुपयांचे कच्चे तेल आयात केले जाते. आम्हाला इथेनॉलवर आधारीत २ लाख कोटींची अर्थव्यवस्था हवी आहे. सध्या फक्त २०,००० कोटी रुपयांची आहे. जर २ लाख कोटींची अर्थव्यवस्था झाली तर १ लाख कोटी शेतकऱ्यांच्या खिशात जातील, असेही गडकरी म्हणाले.