महाराष्ट्र २४ – ऑनलाईन वृत्तसेवा – विशेष प्रतिनिधी – दि. १९ डिसेंबर -कोरोनाचा फटका बसलेल्या अर्थव्यवस्थेला सावरण्यासाठी सरकारने अनेक पावले उचलली. मात्र, सरकारने कितीही अशी पावले उचलली तरी ती अर्थव्यवस्था रुळावर आणण्यासाठी पुरेशी नाहीत, असे मत अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी व्यक्त केले. ‘इंडियन चेंबर ऑफ कॉमर्स’च्या वार्षिक परिषदेत त्या बोलत होत्या.‘आत्मनिर्भर भारत’ योजनेंतर्गत तीन वेळा अर्थसाहाय्य जाहीर करण्यात आले. अर्थव्यवस्थेला उभारी देण्यासाठी ही पावले आवश्यक होती, असे सीतारामन म्हणाल्या