महाराष्ट्र २४ – ऑनलाईन वृत्तसेवा – विशेष प्रतिनिधी – दि. २ जानेवारी – नववर्षात राजधानीत विक्रमी थंडी पडली आहे. दिल्लीत पारा १.१ अंशांपर्यंत घसरला. हे गेल्या १५ वर्षांतील नीचांकी तापमान आहे. द्रासमध्ये तापमान उणे २६.८ अंश होते.
– कृषी कायद्यांच्या विराेधात आंदोलन करत असलेले शेतकरी कडाक्याच्या थंडीतही सलग ३८ व्या दिवशी तळ ठोकून आहेत.
– शेतकरी नेते म्हणाले, केंद्रासोबत ४ जानेवारीच्या बैठकीत तोडगा निघाला नाही तर हजारो शेतकरी दिल्लीकडे कूच करतील.