महाराष्ट्र 24 । विशेष प्रतिनिधी । दि.२४। मुंबई । मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कोरोनाचा वाढत प्रादुर्भाव लक्षात घेता कार्यालयीन वेळेत बदला करण्याचे आदेश दिल्यानंतर पोलीस खात्याच्या कार्यालयीन वेळेत बदल करण्याचे आदेश पोलीस महासंचालक संजीव कुमार सिंघल यांनी दिले आहेत.
सकाळी 9 ते सायंकाळी 4 या कालावधीत गट अ व गट ब वर्गातील अधिकारी 100 टक्के तर गट क व गट ड उपस्थित 50 % राहतील. 25 टक्के कर्मचारी कार्यालयात उपस्थित राहतील, तर 11 ते 5 या कालावधीत 25 टक्के कर्मचारी कार्यालयात असतील. उर्वरीत क व ड चे कर्मचारी वर्क फ्रॉम होम करतील, पण ज्यावेळी तातडीची आवश्यकता असेल, त्यावेळी अधिकारी कर्मचाऱ्यांना कामावर बोलावू शकतात. जे कर्मचारी वर्क फ्रॉम होम करणार आहेत ते फोनवर उपलब्ध असणार आहे. गट क व गट ड 50 % कर्मचारी उपस्थित राहणार. त्यापैकी 25 टक्के सकाळी 9 ते सायंकाळी 4 पर्यंत तर 25 टक्के कर्मचारी सकाळी 11 ते सायंकाळी 5 पर्यंत उपस्थित राहतील.