​​​​​​​केंद्राची 30 पथके आज महाराष्ट्रात ; कोरोना परिस्थितीचा घेणार आढावा

Spread the love

महाराष्ट्र २४ । ऑनलाईन । विशेष प्रतिनिधी । नवीदिल्ली । दि. ८ एप्रिल । राज्यातील कोरोनाची स्थिती हाताळण्यात राज्य अारोग्य विभागाची होत असलेली दमछाक पाहून आता केंद्राचा आरोग्य विभाग अॅक्शन मोडवर आला आहे. महाराष्ट्र, पंजाब आणि छत्तीसगडसाठी केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने तज्ज्ञांची एकूण ५० पथके तयार केली असून यापैकी ३० पथके गुरुवारपासून महाराष्ट्रात येणार आहेत.

पहिल्या लाटेला तोंड दिल्यानंतर या दुसऱ्या मोठ्या लाटेला थोपवताना राज्याच्या आरोग्य विभागाची दमछाक होत आहे. दिवसागणीक बिकट होणारी स्थिती पाहून केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने तज्ज्ञांची पथके महाराष्ट्राच्या विविध जिल्ह्यांत पाठवण्याचा निर्णय घेतला. गुरुवारपासून ही पथके दौरे सुरू करतील. ३ ते ५ दिवस नियोजित जिल्ह्यांमध्ये राहून स्थानिक प्रशासनासोबत पाहणी केल्यावर ही पथके रोज केंद्राला त्या िजल्ह्यातील स्थितीचा अहवाल कळवतील. शिवाय, जिल्ह्यांमध्ये योग्य पद्धतीने परिस्थिती हाताळली जात आहे का, की कुठे चुका होत आहेत हे पाहून सूचनाही देण्याचे काम पथक करेल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *