निर्बंध व मार्गदर्शक तत्त्वे: ‘ब्रेक द चेन’साठी नवीन मार्गदर्शक तत्त्वे जाहीर

Spread the love

महाराष्ट्र २४ । ऑनलाईन । विशेष प्रतिनिधी । दि.२१ एप्रिल । मुंबई । कोविड-१९ चा प्रसार थांबविण्यासाठी महाराष्ट्र शासनाने काही निर्बंध व मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत, जी १ मे २०२१ च्या सकाळी सात वाजेपर्यंत अमलात राहतील. परंतु महाराष्ट्रामध्ये कोरोनाचा प्रसार होण्याची शक्यता लक्षात घेता सदर निर्बंधांमध्ये काही फेरबद्दल केले आहेत.

साथीचे रोग कायदा १८९७ च्या कलम दोन, तसेच आपत्ती व्यवस्थापन कायदा २००५ च्या तरतुदीनुसार सदर बदल करण्यात येत असल्याची माहिती राज्याचे मुख्य सचिव सीताराम कुंटे यांनी दिली आहे. हे बदल पुढीलप्रमाणे असतील व २० एप्रिल संध्याकाळी ८ वाजेपासून १ मे रोजी सकाळी ७ वाजेपर्यंत अस्तित्वात राहतील.

सर्व किराणा दुकाने, भाजीपाला दुकाने, फळ विक्रेते, डेअरी, बेकरी आणि मिठाई दुकाने, सर्व खाद्यपदार्थांची दुकाने (चिकन, मटण, कोंबडी, मासे, अंडींसह), कृषी अवजारे व कृषी उत्पादने, पाळीव प्राण्यांच्या खाद्याची दुकाने, पावसाच्या हंगामासाठी साहित्य (वैयक्तीक व संघटनात्मक) सकाळी ७ ते ११ वाजेपर्यंत उघडे राहतील. असे सरकारने प्रसिद्ध केलेल्या निवेदनात म्हटले आहे.

असे असतील नवीन निर्बंध आणि मार्गदर्शक तत्त्वे
– दुकानांतून सकाळी ७ ते संध्याकाळी ८ पर्यंत घरपोच सेवेस मुभा असेल पण स्थानिक प्रशासन या वेळांमध्ये फेरबदल करू शकते.
– स्थानिक आपत्ती व्यवस्थापन प्रशासन कलम दोन अंतर्गत काही गोष्टींना व सेवांना, राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाची संमती घेऊन आवश्यक सेवा म्हणून घोषित करू शकते.
– या आदेशामध्ये नमूद केलेल्या गोष्टींव्यतिरिक्त इतर सर्व अटी व नियम १३ एप्रिल २०२१ रोजी राज्य शासनाद्वारे जाहीर करण्यात आलेल्या पत्रकानुसारच असतील.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *