महाराष्ट्र २४ । ऑनलाईन । विशेष प्रतिनिधी । पुणे । दि.४ मे । उन्हाळ्याच्या काळात आरोग्याची काळजी घेणे फार महत्वाचे आहे. आज अशाच एका फळाबद्दल आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. जे खाल्ल्याने तुमची रोगप्रतिकारक शक्ती मजबूत होते. करवंदमध्ये व्हिटॅमिन सी मोठ्या प्रमाणात असते. हे उन्हाळ्यात आपले शरीर थंड ठेवते. करवंदमध्ये असे काही घटक असतात. त्यामुळे अनेक आजार हे आपल्याापासून दूर राहतात. यासाठी उन्हाळ्याच्या हंगामात जास्तीत-जास्त करवंद खा. करवंद फक्त रोगप्रतिाकारक शक्ती वाढवण्यासाठीच नाहीतर अनेक आजारांवर रामबाण उपाय आहेत.
श्वसन समस्या
करवंद खाल्ल्याने आपल्या रोगप्रतिकारक शक्तीबरोबरच श्वसनाची समस्या देखील दूर होते. जर आपण करवंदचा रस दररोज सकाळी रिकाम्या पोटी घेतला तर श्वसनाची समस्या कायमची दूर होण्यास मदत होईल. जर आपण करवंदच्या रसात लिंबाचा आणि आल्याचा रस मिसळला तर ते आणखीन फायदेशीर होईल.
अशक्तपणा
करवंदमध्ये व्हिटॅमिन ए आणि सी, प्रथिने, मॅग्नेशियम, कॅल्शियम, पोटॅशियम, सोडियम, फॉस्फरस इत्यादी खनिजे असतात जे आपल्या शरीराची कमकुवतपणा काढून स्नायूंना बळकट करतात.
सांधेदुखी
ज्यांना सांधेदुखीचा त्रास आहे. अशांनी करवंदाचे सेवन केले पाहिजे. तसेच आपले पाय खूप दुखत असतील तर त्याठिकाणी करवंदाचे पाने चोळा यामुळे काही मिनिटांमध्येच आराम मिळेल.
पित्ताची समस्या
पित्ताशी संबंधित समस्या दूर करण्यासाठीही करवंद खूप प्रभावी आहे. याशिवाय हे नियमित सेवन केल्याने किंवा रस पिल्याने पाचन तंत्र सुधारते आणि गॅस, आंबटपणा, अपचन यासंबंधातील समस्या दूर होतात.
बीपी-कोलेस्ट्रॉल
करवंदमधील असलेले खनिज रक्तदाब आणि कोलेस्टेरॉल नियंत्रित करण्यास उपयुक्त ठरतात. याशिवाय अशक्तपणा असलेल्या रूग्णांसाठीही हे खूप फायदेशीर आहे. हे हेमोग्लोबिन खूप वेगाने वाढवण्याचे काम करतात.
टीप – सादर माहिती ही सामान्य माहिती आहे कोणत्याही उपचार करण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घ्या