सर्वसामान्य नागरिकांना महागाईचा फटका ; खाद्यतेलापाठोपाठ फळे आणि भाज्यांचे भावही गगनाला भिडले

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । ऑनलाईन । विशेष प्रतिनिधी । पुणे । दि. ११ मे ।लॉकडाऊनमुळे देशातील 60 टक्क्यांहून अधिक कृषी उत्पन्न बाजार समित्या (एपीएमसी) अर्थात मंडई बंद आहेत. यामुळे शेतकर्यांनाही मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. (Along with cooking oil, prices of fruits and vegetables also hike)

सीएनबीसी आवाजच्या रिपोर्टनुसार, लॉकडाऊनमुळे देशभरात फळे आणि भाज्यांच्या किंमतीत मोठी वाढ झाली आहे. मंडई अर्थात कृषी उत्पन्न बाजार समित्या बंद राहिल्यामुळे शेतकर्यांची उत्पादने बाजारापर्यंत पोहोचत नाहीत. याच कारणामुळे मागणीच्या तुलनेत पुरवठा होत नाही. फळे आणि भाज्यांची खूप कमी प्रमाणात आवक होत आहे. त्याचा थेट परिणाम फळे-भाज्यांच्या किंमतीवर दिसून येत आहे.

जाणकारांच्या मते, कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी अनेक राज्यांनी लॉकडाऊन तसेच कठोर निर्बंध लागू केले आहेत. ज्या ठिकाणी काही प्रमाणात मंडई सुरू आहेत, तेथे मर्यादित स्वरुपात फळे-भाज्यांची आवक होत आहे. कोरोनामुळे व्यापारीही फळे-भाज्यांच्या व्यवसायात तितकीशी रुची दाखवत नसल्याचे भाजी मार्केटशी संबंधित जाणकारांचे मत आहे. गेल्या वर्षीच्या लॉकडाऊनपेक्षा यंदाच्या लॉकडाऊनमध्ये फळे-भाज्यांच्या आवकवर मोठा परिणाम झाला आहे. लॉकडाऊन काळात काही कृषी उत्पन्न बाजार समित्या सुरू आहेत. लॉकडाऊनचा रस्ते वाहतुकीवर परिणाम झाला आहे. रस्ते वाहतूक पूर्वीप्रमाणे होत नसल्यामुळे शेतात लागवड केलेल्या भाज्या आणि फळांची कृषी उत्पन्न बाजार समित्यांपर्यंत वाहतूक करणे मुश्किल झाले आहेत.

मार्चमध्ये फळे आणि भाज्यांची किंमत गेल्या वर्षीच्या तुलनेत अधिक होती. बदललेल्या परिस्थितीचा थेट ग्राहकांच्या बजेटवर परिणाम झाला आहे. देशात मे आणि जून महिन्यात आंशिक लॉकडाऊन राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे येत्या दिवसांत फळे आणि भाज्यांच्या किंमती चढ्याच राहण्याचा अंदाज मार्केट तज्ज्ञांनी वर्तवला आहे. याचाच अर्थ सर्वसामान्य नागरिकांना खाद्यतेलाबरोबरच फळे-भाज्यांच्या दरवाढीपासून सध्यातरी दिलासा मिळण्याची चिन्हे कमी आहेत. (Along with cooking oil, prices of fruits and vegetables also hike)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *