महाराष्ट्र २४ । ऑनलाईन । विशेष प्रतिनिधी । दि. १६ मे ।एप्रिल-मे महिन्यातील तीन आठवड्यांत राज्यात हॉटस्पॉट शहरांतील रुग्णसंख्येत घट नऊ एप्रिल ते १५ एप्रिल २०२१ हा लॉकडाऊनपूर्वीचा आठवडा आणि ८ मे ते १४ मे हा नुकताच संपलेला आठवडा यांचा तुलनात्मक अभ्यास केला असता राज्यात आढळणाऱ्या दैनंदिन रुग्णसंख्येमध्ये २४.५७ टक्क्यांनी घट झाली आहे.
९ एप्रिल ते १५ एप्रिल २०२१ या आठवड्यात राज्यात सरासरी ५८६१५ एवढे रुग्ण रोज नव्याने आढळत होते. हे प्रमाण मागील आठवड्यात ४४,२१२ इतके कमी झाले आहे. राज्यातील ३५ पैकी १७ जिल्ह्यांमध्ये रुग्णसंख्या कमी होताना दिसत असून सर्वाधिक ८१ टक्के घट नांदेड जिल्ह्यात झाली आहे. याच काळात मुंबईत ७७ टक्के, ठाणे जिल्ह्यामध्ये ७१ टक्के, पुण्यामध्ये २३.४७, नाशिकमध्ये ३०.४७ टक्के, तर नागपूर जिल्हामध्ये ५८.५४% घट झालेली आहे. भंडारा, नंदुरबार, लातूर, हिंगोली, गोंदिया, रायगड, जळगाव, परभणी, धुळे आणि जालना या जिल्ह्यांमध्येही सरासरी दैनंदिन रुग्णसंख्या कमी होताना दिसत आहे.