महाराष्ट्र २४ । ऑनलाईन । विशेष प्रतिनिधी । दि. १६ मे ।शेतकऱ्यांनी एकी एक करून रासायनिक खतांच्या वापरावर बहिष्कार करावा. बघा खतांच्या किंमती अतोनात कमी खतांच्या किंमती अतोनात कमी होतील गरज आहे शेतकर्यांच्या एकजुटीची कारण आत्तापर्यंत कोणत्याही उत्पादित मालाच्या किंमतीत अचानकपणे अशी दिडपटीने वाढ झालेली आठवत नाही. या मागे निश्चितच काहीतरी कारस्थान आहे जेणेकरून शेतकरी जास्त अडचणीत यावेत.रासायनिक खतांच्या कच्चा मालाच्या किंमतीत वाढ झालेली असली तरी अशी दिडपटीने वाढ कोणत्या आधारावर केली आहे त्याचे कॉस्टिंग सरकारने तपासले पाहीजे. खतांच्या उत्पादनाच्या मक्तेदारीचा फायदा घेऊन कंपन्यांनी एकजूट करून आर्थिक फायदा घेण्याचा केलेला दिसतोय….म्हणून केंद्र सरकारकडून खतांच्या किंमतीचे कॉस्टिंग करून शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न केला जाईल हिच अपेक्षा….कारण कोरोना महामारी मुळे सर्वांचीच परिस्थीती वाईट आहे….त्यात शेतकरी जगने गरजेचे आहे….कारण आताच्या परिस्थितीत शेतकरीं जगला तरच देश जगेल……पि.के.महाजन.