राज्यात 5 टप्प्यात अनलॉक करणार , पाहा काय सुरु काय बंद?

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. ३ जून । राज्यातील जनतेसाठी महत्वाची बातमी आहे. राज्यात एकूण 5 टप्प्यांमध्ये लॉकडाऊनचे (Maharashtra Unlock to 5 step) नियम शिथील करणार असल्याची माहिती मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वड्डेटीवार (Vijay Namdevrao Wadettiwar) यांनी दिली आहे. ज्या ठिकाणी कोरोना रुग्णसंख्या कमी आहे, त्या ठिकाणी अनलॉक करण्याला सुरुवात होणार आहे. या नियमांची अमंलबजावणी उद्यापासून (4 जून) करण्यात येणार आहे. पत्रकार परिषदेदरम्यान वडेट्टीवार यांनी अनेक घोषणा केल्या. (Maharashtra unlocked in 5 phases informed Minister Vijay Wadettiwar)

पहिल्या टप्प्यात जमावबंदी शिथील करण्यात आली आहे. पहिल्या टप्प्यातील शहरांमध्ये लग्नासाठीची मर्यादा ही 25 वरुन 200 इतकी करण्यात आली आहे.

पहिल्या टप्प्यात कोणते जिल्हे?

पहिल्या टप्प्यामध्ये एकूण 18 जिल्हे अनलॉक करण्यात आले आहेत. यामध्ये धुळे, जळगाव, नाशिक, बुलडाणा, भंडारा, गडचिरोली, गोंदिया, नागपूर, वर्धा, वाशिम, यवतमाळ, चंद्रपूर, औरंगाबाद, जालना, लातूर, नांदेड, परभणी आणि ठाणे या जिल्ह्यांचा समावेश आहे. पहिल्या टप्प्यांमध्ये चित्रपटगृह, जिम, दुकानं, मॉल्स, मॉर्निंग वॉकला परवानगी देण्यात आली आहे. तसेच कार्यालयांना 100 टक्के उपस्थितने सुरु करण्यास मुभा दिली आहे.

दुसऱ्या टप्प्यामध्ये एकूण 7 जिल्ह्यांचा समावेश आहे. यामध्ये अहमदनगर, अमरावती, हिंगोली, मुंबई नगर, मुंबई उपनगर आणि नंदुरबार या जिल्ह्यांचा समावेश आहे.

तिसऱ्या टप्प्यात एकूण 10 जिल्ह्यांचा समावेश आहे. यात सांगली, सातारा, सोलापूर, कोल्हापूर, उस्मानाबाद, बीड, अकोला, पालघर, रत्नागिरी आणि सिंधुदुर्गचा समावेश करण्यात आला आहे.

चौथ्या टप्प्यात केवळ 2 जिल्हे आहेत. यात रायगड आणि पुण्याचा समावेश आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *