महाराष्ट्र २४- हिंगणघाट येथील जळीत प्रकरणातील पीडित शिक्षिकेने तब्बल आठ दिवस मृत्यूशी झुंज देत अखेर सोमवारी सकाळी ६ वाजून ५५ मिनिटांनी अखेरचा श्वास घेतला.
पीडित शिक्षिकेचा मृत्यू झाल्याचे कळताच तिच्या आईने हंबरडा फोडला. वडीलही ओक्साबोक्शी रडत होते. माझ्या मुलीला जसे जाळले तसेच त्या नराधमाला जाळा किंवा त्याला फाशीची गंभीर शिक्षा द्या, असे पिडितेची आई म्हणत होती. तर आता मी जगणार कसा असे रडत रडत तिचे वडील बोलत होते.
हिंगणघाट येथील हे जळीत प्रकरण जलदगती न्यायालयात चालविण्यात येणार असून प्रसिध्द सरकारी वकील उज्वल निकम हा खटला लढणार आहे