महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. २ जुलै । संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचं आज प्रस्थान होत आहे. कोरोना पार्श्वभूमीवर सलग दुस-या वर्षी प्रस्थान सोहळा मर्यादित म्हणजेच 100 वारक-यांच्या उपस्थितीत होत आहे. प्रस्थानानंतर दर्शनासाठी 350 वारकऱ्यांना परवानगी देण्यात आलीय. (Santshrestha Dnyaneshwar Maharaja Palkhichan departs today) मात्र त्यातील जवळपास 20 जणांना कोरोनाची लागण झालीय. कोरोनाचं हे संकट असताना उत्साह कायम आहे.
आळंदीत आज माऊलींचा पालखी सोहळा आहे. माऊली पालखी प्रस्थान सोहळ्यासाठी निवडण्यात आलेल्या १०० वारक-यांपैकी दोघांना कोरोनाची लागण झालीय. तर दर्शनासाठी परवानगी दिलेल्या १६४ पैकी २० वारक-यांना कोरोनाची लागण झाल्याचं उघड झालं आहे.
माऊलींच्या पालखीचं आज प्रस्थान होत आहे. यंदा कोरोनामुळे आळंदीत संचारबंदी आहे. त्यामुळे इंद्रायणीच्या घाटावर सामसूम आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदा वारीसाठी कठोर निर्बंध लावण्यात आले आहेत. तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर प्रशासन सज्ज आहे. विठूरायाच्या भेटीसाठी तुकोबारायांचा पालखी प्रस्थान सोहळा सुरू झाला आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रस्थान सोहळ्यासाठी केवळ वारक-यांनाच परवानगी देण्यात आली आहे.