महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. ९ जुलै । कॉलेज सुरु करणं म्हणजे एक मोठा समूह हा एकत्र वर्गामध्ये येणे, तो जर एका जागी आला तर कोव्हिडची तिसरी लाट येऊ शकते. तिसरी लाट आली तर विद्यार्थ्यांना त्रास होऊ शकतो त्यांच्यामुळे त्यांच्या पालकांना आणि इतरांना त्रास होऊ शकतो. सध्या तरी कॉलेज सुरू करण्याची कुठलीही प्रोव्हिजन या पंधरा वीस दिवस महिनाभरात केली नाहीय, असं उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत म्हणाले.