महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. १४ जुलै । कोरोनाचा व्हेरियंट वारंवार रुप बदलणारा आहे. त्यामुळे त्याबाबत अधिक सतर्क राहण्याची गरज आहे असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलंय. तिसरी लाट रोखण्यासाठी चाचण्या आणि उपचार यावर अधिक जोर देण्याची गरज असल्याचंही मोदींनी म्हटलंय. गेल्या काही दिवसांत हिल स्टेशनवर होणाऱ्या पर्यटकांच्या गर्दीवरही मोदींनी चिंता व्यक्त केलीय. आसाम, मिझोराम, अरुणाचल प्रदेश आणि मणिपूरच्या मुख्यमंत्र्यांशी पंतप्रधानांनी संवाद साधला. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने २३ हजार कोटींचा नवं पॅकेज दिल्याची माहितीही मोदींनी दिली. लसीकरणावर जोर द्या, मास्कचा वापर करा आणि गर्दी टाळा असं आवाहनही मोदींनी केलंय.