पावसाळ्यात (Monsson) बाजारात मिळणारी ही बहुगुणी भाजी ; पहा तिचे औषधी गुणधर्म (Medicinal properties)

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. १७ जुलै । कडू कारलं न आवडणाऱ्यांसाठी गोड कारलं म्हणजेच कंटोळी हा एक चांगला पर्याय आहे. कारल्या प्रमाणे याचीही भाजी बनते. यात मोठ्या प्रमाणात औषधी गुणधर्म असतात. यात प्रोटीन, फाइटोकेमिकल्स, मोमोरडीसीन, ऍन्टी-ऑक्सिडेट आणि फायबर कडू कारलं (Bitter Gourd) आवडत नाहीत असे बरेच जण आपल्या आजूबाजूला असतात. कारल्याची कडू चव त्यांना आवडत नसते. ज्यांना काडू कारलं अवडत नाही त्यांना याची कल्पनाही नसते की, त्यात किती मोठ्या प्रमाणात पोषक घटक असतात.कांटोळ ही सर्व भाज्यांमध्ये आरोग्यादायी भाजी मानली जाते. यात ऍन्टी-एलर्जेन आणि एनाल्जेसिक गुणधर्म असतात. म्हणूनच खोकल्या सारख्या आजारात फायदेशीर मानलं जातं.

कंटोळमध्ये भरपूर प्रमाणात फायबर आढळतं. ज्याने पचन सुधारतं. ज्यांना अपचन आणि बद्धकोष्ठतेची समस्या आहे त्यांना हे फायदेशीर आहे. पचनयंत्रणा सुधारायची असेल तर,’गोड करलं’ म्हणजे कंटोळ खाण्यास सुरवात करा.कॅन्सर सारखा दुर्धर आजारा होऊ नये यासाठी कंटोळ खायला हवेत. शरीरातील वाढलेल्या वाईट रॅडिकल्स कॅन्सरचं एक कारण आहेत. कंटोळ मधील गुणधर्म या रॅडिकल्सना संपवतात. कंटोळ मधील ल्यूटिन सारखं केटोनोइड कॅन्सरच्या प्रतिबंधास मदत करतात.

तज्ज्ञांच्या मते, कंटोळने हृदय आणि डोळ्याच्या आजारात फायदा होतो. त्यात व्हिटॅमिन ए असतं,जे दृष्टी सुधारण्यासाठी खूप महत्वाचं आहे. दृष्टी सुधारण्यासाठी आपल्या आहारात याचा समावेश करू शकता.कंटोळ पावसाळ्यात बाजारात मिळणारी रानभाजी आहे. केवळ पावसाच्या सिझनमध्येच ती मिळते. त्यामुळे या काळात भपरूर कंटोळ भाजी खावी.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *