महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. २७ जुलै । बारावीच्या निकालाचे काम पूर्ण झाले असून राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने निकाल जाहीर करण्याची तयारी पूर्ण केली आहे. राज्य मंडळाकडून लवकरच निकालाच्या तारखेची घोषणा होण्याची शक्यता आहे.
राज्यात कोल्हापूर आणि कोकणात अतिवृष्टी झाल्याने काही भागातून निकालाची माहिती येणे बाकी असून उर्वरित ठिकाणची माहिती मंडळाकडे आली असल्याने हा निकाल वेळेत जाहीर केला जाईल, असेही मंडळाकडून सांगण्यात आले. सर्वोच्च न्यायालयाने 31 जुलैपूर्वी बारावीचे निकाल जाहीर करा असे निर्देश दिले होते. त्या मुदतीपूर्वीच राज्य शिक्षण मंडळाकडून बारावीचा निकाल जाहीर केला जाणार असल्याचेही सांगण्यात आले.