आम्ही जे करतोय ते बाबासाहेबांनीच घटनेत लिहून ठेवलंय : नितीन गडकरी

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ – नागरिकत्वाचा मुद्दा हा डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनीच घटनेत लिहून ठेवल्याचं वक्तव्य केंद्रीय मंत्री नितीन गडकरी एबीपी माझा आयोजित ‘माझा महाराष्ट्र ,माझं व्हिजन’ या कार्यक्रमात केलंय.
यावेळी नागरिकत्व दुरुस्ती कायद्याविषयी बोलताना गडकरी म्हणाले, “नागरिकत्व दुरुस्ती कायदा हा नवीन कायदा नाही, तर महात्मा गांधी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि पंडित नेहरू यांनी यापूर्वीच लिहून ठेवलं आहे.”
ते पुढे म्हणाले, “प्रत्येक गोष्ट आपल्या देशात तयार व्हायला हवी, कारण ती क्षमता आपल्या देशात आहे. गेल्या 5 वर्षांत दळणवळण क्षेत्रात महाराष्ट्रानं चांगलं काम केलं आहे.”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *