‘उज्ज्वला’ योजनेला लागली गळती, लाभार्थ्यांनी घेतला सिलिंडर न भरण्याचा निर्णय

Spread the love

Loading

महाराष्ट्र 24 -नवी दिल्ली

वाढत्या महागाईमुळे सामान्य पिचलेले असतानाचा महागणाऱ्या घरगुती सिलिंडरमुळे गरिबांचे कंबरडेच मोडल्याचे दिसून येत आहे. गॅस सिलिंडरच्या वाढत्या किमतींमुळे उज्ज्वला योजनेच्या लाभार्थ्यांनी सिलिंडर न भरण्याचा निर्णय घेतला आहे. या पार्श्वभूमीवर स्वयंपाकासाठी उपयुक्त लाकडेही महागल्याने त्यांची अवस्था इकडे आड तिकडे विहीर अशी झाली आहे. उज्ज्वला योजनेंतर्गत ९६ टक्के परिवारांना घरगुती गॅस सिलिंडरची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. मात्र, सिलिंडरच्या दरात वाढ होत असल्याने पुन्हा स्वयंपाकासाठी ते लाकडाकडे वळत असल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे सप्टेंबरमध्ये लाकडाच्या किमतीत १० टक्क्यांची वाढ नोंदविण्यात आली आहे. सप्टेंबरपूर्वी लाकडाचे दर घट असतानाच आता दरांमध्ये वाढ होताना दिसून येत आहे.

गेल्या काही दिवसांमध्ये पाहिले असता घरगुती गॅसच्या दरात २५ टक्के वाढ झाली आहे. राजधानी नवी दिल्लीमध्ये सध्या विनाअनुदानित सिलिंडर ८५९ रुपयांना मिळत आहे. हाच सिलिंडर ऑगस्ट २०१९मध्ये ५७५ रुपयांना मिळत होता. याचा अर्थ केवश सहा महिन्यांत सिलिंडरच्या दरात २८४ रुपयांची वाढ झाली आहे. सिलिंडरच्या दरात सर्वाधिक वाढ दिल्लीतील विधानसभा निवडणुकीनंतर पाहायला मिळाली आहे. निवडणुकीनंतर सिलिंडरच्या दरात १४५ रुपयांची वाढ नोंदविण्यात आली आहे. महाराष्ट्र, झारखंड आणि हरियाणामध्ये निवडणुकीनंतर महिनाभरात घरगुती गॅसच्या दरात ७७ रुपयांची वाढ झाली आहे. ज्याप्रमाणे सिलिंडरच्या दरात वाढ होत आहे, त्याचप्रमाणे जळाऊ लाकडाच्या दरातही वाढ होत असल्याने गरिबांची अवस्था बिकट झाली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *