महाराष्ट्र 24 -अकोला – आर्थिक वर्षाचा शेवटचा महिना आणि बँकांमध्ये गर्दी ठरलेलीच. मात्र, याच महिन्यातील दुसऱ्या आठवड्यात १० ते १५ मार्चपर्यंत सहा दिवस सर्व राष्ट्रीयीकृत बँकांचे काम ठप्प राहणार आहे. बँक एम्प्लॉयी फेडरेशन ऑफ इंडिया (बीईएफआय) आणि ऑल इंडिया बँक एम्प्लॉयी असोसिएशन (एआयबीईए) यांच्या वतीने संपाचे हत्यार उपसण्यात येणार आहे.
बँक कर्मचाऱ्यांच्या मागण्यांचा विचार झाला नाही, तर सार्वजनिक क्षेत्रातील सर्व बँकांचे कर्मचारी ११ ते १३ मार्च दरम्यान तीन दिवसांच्या संपावर जाणार आहेत. त्यापूर्वी मंगळवार, १० मार्च रोजी धूलिवंदनानिमित्त सुटी आहे. संपाच्या तीन दिवसांनंतर १४ मार्चला दुसरा शनिवार असून, १५ मार्चला रविवार आहे. त्यामुळे बँका सलग सहा दिवस बंद राहणार आहेत.