महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. २१ ऑक्टोबर । कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कर्नाटक आणि महाराष्ट्र राज्यातून एसटी सेवा बंद असल्याने शेकडो प्रवाशांचे हाल होत आहेत. कर्नाटकातील एसटी महाराष्ट्र सीमेपर्यंत आणि महाराष्ट्रातील एसटी बस कर्नाटक सीमेपर्यंतच थांबत असल्याने तेथून पुढे प्रवास करण्यासाठी प्रवाशांना खासगी वाहनांचा आधार घ्यावा लागत आहे. खासगी वाहन चालकांकडून मनमानी पध्दतीने दर आकारणी करुन प्रवाशांची आर्थिक लुटमार सुरू आहे. त्यामुळे प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी महाराष्ट्र-कर्नाटकातील एसटी सेवा सुरु करावी, अशी मागणी प्रवाशी वर्गातून होत आहे.