रेल्वे प्रवास पूर्वीप्रमाणेच सुरु ! कोरोना काळातील स्पेशल ट्रेन्स बंद

Spread the love

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. १३ नोव्हेबर । कोरोनामुळे नियमित रेल्वे गाड्यांना बंदी घालण्यात आली होती. त्याऐवजी विशेष गाड्या चालवल्या जात होत्या. पण आता कोरोनाही नियंत्रणात असल्याने आणि परिस्थितीही बऱ्यापैकी आहे. अशा परिस्थितीत रेल्वे मंत्रालयाने मोठा निर्णय घेत पुन्हा नियमित रेल्वे गाड्या सुरू केल्या आहेत. काही दिवसांतच देशभरातील 1700 हून अधिक गाड्या नेहमीच्या गाड्यांप्रमाणे पूर्ववत केल्या जातील अशी माहिती देण्यात आली आहे. यासाठी सरकारने क्रिस (CRIS)ला सॉफ्टवेअरमध्ये आवश्यक बदल करण्यास सांगितले आहे.

जारी केलेल्या परिपत्रकात हेही स्पष्ट करण्यात आले आहे की, आता पुन्हा कोविडपूर्व दर लागू करण्यात आले आहेत. म्हणजे आजवर जे विशेष दर दिले जात होते ते आता बदलेल आणि त्यानंतर नियमित दर भरावे लागेल. या सगळ्याशिवाय आता जनरल तिकीट व्यवस्थाही संपणार आहे. आता फक्त रिझर्व्ह आणि वेटिंग तिकीट असलेल्यांनाच प्रवास करण्याची परवानगी दिली जाईल, असे सांगण्यात आले आहे. सामान्य वर्गाचे (जनरल क्लास) तिकीट अस्तित्वात नाही. आधीच बुक केलेल्या रेल्वे तिकिटांवर कोणतेही अतिरिक्त भाडे आकारले जाणार नाही, तर कोणतेही पैसे परत केले जाणार नाहीत यावरही जोर देण्यात आला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *