महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. १८ नोव्हेबर । उस्मानाबाद जिल्हा प्रतिनिधी:-सलमान मुल्ला ।
मातंग महामोर्चा संयोजन समितीच्या अध्यक्ष पदी संतोष अहिरे तर सचिन पदी बालाजी गायकवाड यांची निवड
उस्मानाबाद:- महाराष्ट्र राज्यामध्ये सुरू होत असलेल्या हिवाळी अधिवेशनावर लहुजी शक्ती सेनेच्या वतिने मातंग समाजाच्या विवीध मागण्यांसाठी महामोर्चा काढण्यात येणार आहे या महामोर्चाच्या संदर्भात काल दिनांक 15 नोव्हेबर 2021 रोजी शिर्डी येथील साई स्वाद हॉटेलमध्ये लहुजी शक्ती सेनच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत नियोजन बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.
राज्यभरामध्ये मातंग समाजावर अन्याय अत्याचाराचे प्रमाण दिवसेनदिवस वाढतानाच दिसत आहे,आजपर्यंत लहुजी शक्ती सेनेने मातंग समाजाच्या न्याय व हक्कांसाठी अनेक दखलपात्र आंदोलने केलेली आहेत परंतू या ठिकाणचे जातीवादी सरकार मुग गिळून गप्प बसलेले आहे, मातंग समाजाच्या मागण्या ताकतीने शासन प्रशासनापर्यत पोहचवण्यासाठी पुढील महिण्यात होणाऱ्या अधिवेशनावर प्रचंड महामोर्चा काढण्याच्या नियोजनासाठी आज शिर्डी येथे ल.श.से च्या राज्य भरातील प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक संपन्न झाली.
सदर महामोर्चाच्या प्रसार प्रचारासाठी राज्यातील ३२ जिल्हे व १८० शहरातुन तसेच हजारो गावामधून “आरक्षण वर्गीकरन मातंग संवाद सायकल महायात्रा” काढण्यात येणार आहे या सायकल महायात्रेचे नेत्रत्व संस्थापक अध्यक्ष विष्णुभाऊ कसबे करणार आहेत सदर महायात्रेचा शेवट अधिवेशनावर होणार असून लाखोंच्या संख्येने मातंग समाज या महामोर्चामध्ये सहभागी होणार असल्याचे यावेळी लहुजी शक्ती सेनचे संस्थापक अध्यक्ष विष्णुभाऊ कसबे यांनी कार्यक्रमाच्या अध्यक्षीय भाषणात सांगितले.
सदर बैठकीस लहुजी शक्ती सेनेचे संस्थापक अध्यक्ष विष्णुभाऊ कसबे प्रमुख पाहुणे म्हणून ऊपस्थित होते.
तसेच यूवक प्रदेश अध्यक्ष सचिन क्षिरसागर,विद्यार्थी आघाडी प्रदेशअध्यक्ष एड.हेमंत खंदारे सह डॉ.अक्षय खरात,संतोष अहिरे, बालाजी गायकवाड,शिवाजी गायकवाड यांनी आपले मनोगत व्यक्त केले यावेळी राज्यभरातील प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते