महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि .२६ जानेवारी । थंडीच्या कडाक्याने मंगळवारी उत्तर महाराष्ट्रासह आता मराठवाडा आणि विदर्भही गारठला आहे. नाशिक जिल्ह्यात रानवड येथे नीचांकी ३.९ तापमान हाेते. त्यामुळे निफाड तालुक्यात काही गावांमध्ये पिकांवरील दवबिंदू गोठले होते. हवामान विभागाने आगामी दोन दिवस उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात तीव्र थंडीच्या लाटेचा अंदाज वर्तवला आहे. मंगळवारी राज्यात ११ ठिकाणी पारा १० अंश सेल्सियसपेक्षा खाली घसरला होता. या कडाक्याच्या थंडीचा गव्हाला फायदा होणार असला तरी तरी उन्हाळी कांदा आणि द्राक्ष पिकांना धोका निर्माण झाला आहे.
किमान तापमान
रानवड ३.९, ओझर ४.०, निफाड ४.५, नाशिक ६.३, अहमदनगर ७.९, पुणे ८.५, जळगाव ८.६, मालेगाव ८.८, औरंगाबाद ८.८, महाबळेश्वर ८.८, बुलडाणा ९.२, गोंदिया १०.२, नागपूर १०.६, परभणी १०.८, सोलापूर ११.२, अकोला ११.०, वर्धा ११.५.
आगामी ४८ तास कायम राहणार थंडीची लाट
पश्चिमी चक्रवातानंतर रविवारपासून उत्तर मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यात किमान तापमानात घसरण झाली . आगामी ४८ तास थंडीची लाट कायम राहण्याचा अंदाज आहे. किमान तापमान १० अंशाच्या खाली आल्यानंतर व कमाल तापमान हे २८ अंशांच्या सरासरीपेक्षा ४ ते ६ अंश कमी नोंदवले गेल्यानंतर थंडीची लाट असे . – सुषमा नायर, हवामान शास्त्रज्ञ, कुलाबा वेधशाळा.