देशवासीयांच्या पाठिंब्याने भारवले पंतप्रधान, व्यक्त केली प्रतिक्रिया

Spread the love

महाराष्ट्र २४ – नवी दिल्ली  : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातल्या जनतेला घराबाहेर न पडण्याचं आवाहन केलं होतं. त्याला सर्व देशवासियांना उत्तम प्रतिसाद दिला. त्याचबरोबर जे डॉक्टर्स, नर्सेस, पोलीस आपलं कर्तव्य बजावत आहेत त्यांच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी सर्वांनी सायंकाळी 5 वाजता आपल्या घरासमोर येत टाळी किंवा थाळी वाजवा असं आवाहनही त्यांनी केलं होतं. त्यांच्या या आवाहनालाही सर्व देशातून उत्स्फुर्त प्रतिसाद मिळाला. ही एका मोठ्या लढाईची सुरूवात असून कोरोनाच्या विरुद्धच्या लढाईचा पहिला शंखनाद आहे असंही त्यांनी म्हटलं आहे.

देशातली जनता अशीच एकजूट दाखवत यापुढेही लढत राहिल असा आशावाद त्यांनी व्यक्त केला.देशावासीयांच्या या प्रतिसादाचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कौतुक केलंय, तसेच आभारही मानले आहेत.
दरम्यान, सर्व जगभर कोरोनाने थैमान घातलंय. जगातल्या 100 पेक्षा जास्त देशांमध्ये कोरोनाचा धुमाकूळ आहे. आता भारतही कोरोनाने व्यापला असून तब्बल 22 राज्यांमध्ये करोनाचे रुग्ण आढळून आले आहेत. दिवसेंदिवस हा आकडा वाढतो आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *