महाराष्ट्र २४ – मुंबई : महाराष्ट्र ३१ मार्चपर्यंत ‘लॉकडाउन’ करण्यात आले आहे. सर्वच शहरांत कलम १४४ लागू करण्यात आले आहे. ‘पंतप्रधानांच्या जनता कर्फ्यूच्या आवाहनाला सर्वांनी प्रतिसाद दिला. त्यामुळं आपण सर्वजण धन्यवादाला पात्र आहात’, अशा शब्दांत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी कौतुक केलं. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही हीच भूमिका घेण्याचे आवाहन केले आहे. त्यांना आपण सर्व जण साथ देऊ या, असंही आवाहन त्यांनी केलं.
जगावर करोनाचं महाभयंकर संकट आलेलं आहे. या संकटातून बाहेर पडण्यासाठी सामूहिक आणि व्यक्तिगत पातळीवर आपण एकजुटीने प्रयत्न करण्याची आवश्यकता आहे. देशाच्या पंतप्रधानांनी संपूर्ण देशात आपले दैनंदिन व्यवहार पूर्णपणे थांबवण्याचं आवाहन केलं. त्याला देशातल्या कानाकोपऱ्यातील लोकांनी प्रतिसाद दिला. तो प्रतिसाद पाहिल्यानंतर आपण सगळेजण धन्यवादाला पात्र आहात, अशा शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी कौतुक केले.