Weather Report | महाराष्ट्रात अनेक जिल्ह्यात उन्हाचा चटका, रात्रीचा गारवा कमी, पारा 35 अंशांपार, हवामानाचा अंदाज ?

Spread the love

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि २५ फेब्रुवारी । फेब्रुवारीच्या (february) शेवटच्या आठवड्यात अनेकांना आता उन्हाची झळ सोसावी लागत आहे, कारण राज्यातल्या तापमानात वाढ झाली आहे. कोरडे हवामान आणि निरभ्र आकाशामुळे स्थितीमुळे तापमानात वाढ झाली असल्याचा अहवाल पुण्यातील (pune) हवामान विभागाने अंदाज व्यक्त केला आहे. तसेच पुढील तीन ते चार तापमानातील वाढ अशीचं राहील अशी शक्यता देखील त्यांनी व्यक्त केली आहे. रात्रीचं तापमान देखील वाढल्याने रात्रीची थंडी देखील गायब झाल्याचं पाहायला मिळत आहे. मध्य महाराष्ट्रासह (maharashtra) अनेक जिल्ह्यात कमाल तापमान सरासरीच्या तुलनेत 2 अंशांनी वाढ झाली आहे. त्याचबरोबर अनेक भागात तापमान 35 अंश सेल्सिअसच्या पुढे गेल्याचं पाहायला मिळतंय.

फेब्रुवारी महिन्यात अनेकदा तुम्हाला उन्हाचे चटके जाणवायला सुरूवात होते. पण यावर्षी ही सुरूवात फेब्रुवारी महिन्यात झाली असल्याची पाहायला मिळत आहे. तुम्हाला सध्या उन्हाचे जाणवत असलेले चटके फक्त कोरडे हवामान आणि निरभ्र आकाश असल्यामुळे जाणवत असल्याचे हवामान विभागाने सांगितले आहे. तसेच आणखी असंच तीन ते चार दिवस महाराष्ट्रात वातावरण राहणार असल्याची शक्यता पुण्यातील हवामान विभागाने व्यक्त केली आहे. त्यामुळे तुम्हाला पुढचे तीन तरी उन्हाचे चटके जाणवतील. अचानक हवामानात बदल झाल्याने अनेकांना उन्हाळा सुरू झाल्याची जाणीव झाली होती. तसेच अनेकांना ही उन्हाळा सुरू झाल्याची सुरूवात आहे, असं देखील वाटलं होतं. पण ही तापमानातील अशीच पुढे चार दिवस राहणार आहे.

मध्य महाराष्ट्रातील पुणे, कोल्हापूर, नाशिक, सांगली, सातारा, सोलापूर आदी भागात कमाल तापमान सरासरीच्या तुलनेत 2 अंशांनी वाढलं असल्याचं पुण्यातील हवामान विभागाने सांगितलं आहे. तर अनेक भागात तापमान 35 अंश सेल्सिअसच्या पुढे आहे. तापमानातील ही वाढ अशीच काही दिवस राहणार असून कोरडे हवामान आणि निरभ्र आकाश यामुळे तापमानात वाढ झाली आहे. राज्यातल्या अनेक जिल्ह्यात रात्रीचा गारवा देखील कमी झाला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *