ओबीसी आरक्षणाशिवाय निवडणुका घेऊ नयेत, मंत्रिमंडळाचा एकमताने निर्णय- भुजबळ

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि ३ मार्च । अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी पार पडलेल्या मंत्रिमंडळ बैठकीमधील निर्णय अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी आज माध्यमांपुढे मांडला.

महाविकास आघाडी सरकार ओबीसी समाजाला न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न करत आहे. कोणत्याही परिस्थितीत ओबीसी आरक्षणाशिवाय निवडणुका घेऊ नयेत, असा निर्णय आज एकमताने मंत्रिमंडळाने घेतला असल्याचे छगन भुजबळ यांनी सांगितले.

हा निर्णय घेतल्यानंतर त्रूटी भरून काढण्यासाठी, सर्वोच्च न्यायालयाचे म्हणणे नेमके काय आहे, या सर्व गोष्टींचा अभ्यास करण्याचे निर्देश मुख्य सचिव आणि प्रधान सचिवांना देण्यात आले आहेत, असेही छगन भुजबळ म्हणाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *