महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. ९ मार्च । दिल्लीसह उत्तर भारतात हवामानात बदल होत आहे. उत्तर भारतातील काही भाग सोडला तर अन्य भागात तापमान सामान्य राहण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. दरम्यान, जम्मू काश्मीरसह राजस्थानमध्ये पाऊस पडण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवली आहे. तसेच दुसरीकडे, आज महाराष्ट्रात देखील वादळी वाऱ्यासह पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. तसेच काही ठिकाणी गारपीटीचा इशारा देखील देण्यात आला आहे.
हवेचा कमी दाबाचा पट्टा तयार झाल्यामुळे महाराष्ट्र आणि गुजरामतमध्ये पावसाची शक्यता आहे. महाराष्ट्रातील कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. उत्तर महाराष्ट्रातही पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. तसेच मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रातील काही जिल्ह्यात गारपीट होण्याची शक्यता देखील हवामान विभागाने वर्तवली आहे.
देशातील इतर राज्यांबद्दल बोलायचे झाले तर, जम्मू-काश्मीरमध्ये आज मुसळधार पाऊस आणि बर्फवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. तसेच 10 मार्चला हवामान स्वच्छ राहणार असल्याची माहिती हवामान विभागाने दिली आहे. जम्मू-काश्मीरमध्ये गेल्या काही दिवसांपासून पाऊस आणि बर्फवृष्टी होत आहे. त्यामुळे नागरिकांना मोठ्या त्रासाला सामोरं जावं लागत आहे. दुसरीकडे तापमानात हळूहळू वाढ होत असल्यानं हवामानात बदल होत आहे. तसेच काही ठिकाणी अद्याप थंडीही जाणवत आहे.