मुख्यमंत्री मान यांनी शेतकऱ्यांना दिली नुकसानभरपाई

Spread the love

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि.२७ मार्च । पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांनी शेतकऱ्यांना एक अब्ज रुपयांपेक्षा अधिक रकमेची भरपाई शनिवारी वाटप केली. पिकांच्या नुकसानीपोटी ही मदत देण्यात आली आहे. मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर मान यांचा येथील धान्याच्या मंडईत हा पहिलाच कार्यक्रम होता.

शेतकऱ्यांच्या कपाशीच्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. त्यापोटी १ अब्ज १ कोटी ३९ लाख ४५ हजार रुपयांची मंजुरी देण्यात आली होती. ही भरपाई केवळ मानसा जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी देण्यात आली आहे. कापूस वेचणाऱ्या मजुरांनाही यातून ७ कोटी ५० लाख रुपयांची भरपाई देण्यात येणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *